Thursday, April 3, 2014

रातातुय - एका उंदराने

'टॉय स्टोरी' पासून चित्रपटनिर्मितीची सुरूवात केलेल्या पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओचा 'फ़ाईंडिंग नीमो' हा चित्रपट पाहिल्यावर पिक्सारने जे गारूड केलं ते आजतागायत कायम आहे. पिक्सारचा कुठलाही सिनेमा आला की निमूटपणे तिकीट काढणे आणि थिएटरमध्ये जाऊन बसणे हे मी जवळजवळ व्रतासारखं पाळतो. 'रातातुय' रिलीज झाला तेव्हाही व्रत पाळलं होतं. २००७ मध्ये वॉल्ट डिस्ने पिक्चर्सने हा सिनेमा रिलीज केला होता.

'एनीवन कॅन कुक' हे घोषवाक्य असलेला गुस्ताव हा पॅरिसमधला एक नामवंत शेफ. अंतोन इगो हा पॅरिसमधला एक प्रख्यात 'फूड क्रिटिक' - अन्न समीक्षक. गुस्तावच्या घोषवाक्याशी असहमत असणारा. त्याच्या एका नकारात्मक लेखामुळे 'गुस्ताव्ज' या रेस्टॉरंटचे 'रेटिंग' घसरते आणि त्या धक्क्याने गुस्ताव मरण पावतो. दुसरीकडे आहे आपला कथानायक - रेमी. रेमी हा उंदीर आपल्या टोळीबरोबर राहतोय, पण त्याचं वेड आहे स्वयंपाक. बाकीचे सगळे भाईबंद काहीही, कसंही, कुठेही खायला उत्सुक असताना रेमीला आस आहे ती निगुतीने अन्न शिजवून खाण्याची. रेमी अपघाताने एकदा 'गुस्ताव्ज'मध्ये पोचतो आणि तिथे त्याला दिसतो लिंग्विनी. कुमारवयातला हा गोंधळलेला पण सरळ मनाचा मुलगा या रेस्टॉरंटमध्ये सफाईचं काम करायला रूजू झालेला आहे. त्याच्याकडून एकदा किचनमध्ये शिजत असलेल्या सूपचं भांडं पडतं आणि सूप सांडल्यामुळे तो काहीतरी करून ते सुधारायचा प्रयत्न करू लागतो. रेमीच्या ते लक्षात येतं आणि तो सूप 'दुरूस्त' करतो. (हे सगळं वाचताना विचित्र वाटत असेल कदाचित, पण ते चित्रपटात जरूर पाहा. कल्पनाशक्तीची झेप म्हणजे काय आणि तिचं एकसंध, प्रभावी सादरीकरण कसं करायचं याचं 'रॅटाटुई' इतर अनेक अ‍ॅनिमेशनपटांसारखंच उत्तम उदाहरण आहे!) लिंग्विनी सूप करतो आहे म्हणून चिडलेला स्किनर ('गुस्ताव्ज'चा सध्याचा मालक आणि चीफ शेफ) जेव्हा ते सूप एका अन्न समीक्षकाला, जी जेवायला तिथे आली आहे, खूप आवडतं तेव्हा अचंभित होतो. 'गारबेज बॉय' लिंग्विनी सूप करतो आहे म्हणून चिडलेला स्किनर कॉलेटच्या (किचनमधली एकमेव स्त्री शेफ) आग्रहामुळे लिंग्विनीला काढून न टाकता त्याला किचनमध्ये सामील करून घेतो.

यानंतर सुरू होतो लिंग्विनी आणि रेमी यांचा 'किचनप्रवास'. तो कसा होतो, शेवटी अंतोन इगो एका उंदराने केलेल्या 'रॅटाटुई' या फ्रेंच डिशमुळे अवाक होऊन 'एनीवन कॅन कुक' मान्य कसं करतो हे प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे.

'द आयर्न जायंट' आणि 'इन्क्रेडीबल्स' या चित्रपटांचा दिग्दर्शक ब्रॅड बर्ड याचा हा तिसरा चित्रपट. रातातुयबद्दल सांगावं असं पुष्कळ काही असलं तरी त्यातला हायलाईट म्हणता येईल अशी एक गोष्ट, जी चित्रपटाचं सारच आहे, ती म्हणजे अंतोन इगोचं चित्रपटाच्या अखेरचं कला, कलाकार आणि समीक्षक यांच्याविषयीचं स्वगत. आपण कल्पनाही करू शकत नव्हतो अशा एका जिवाकडून आपल्या आईच्या हातच्या 'रातातुय'ची आठवण करून देणारं रातातुय खायला मिळाल्यावर इगो समीक्षक म्हणून आपल्या ताठर भूमिकेवर पुनर्विचार करतो. नवीन काहीतरी करण्याची ऊर्मी असलेला कलाकार, आपल्या निर्मितीतून बोलणारा कलाकार आणि कसलीही रिस्क न घेता फक्त कलाकृतींची चिरफाड करणारा समीक्षक यात अखेरीस निर्मितीक्षम कलाकारच महत्त्वाचा ठरतो हे इगो मान्य करतो.

मुळात कलानिर्मिती ही कशातही आणि मुख्य म्हणजे 'कोणा एकात' बांधून ठेवता येत नाही. निर्मिती एकीकडे सुरू असते, तिची ओढ असलेले जातिवंत निर्माते त्यात रमलेले असतात, धडपडत असतात आणि ती अस्सल आहे की टाकाऊ, तिचे दृश्य-अदृश्य परिणाम याची चर्चा दुसरीकडे सुरू असते. समीक्षेचं एक महत्त्व नक्कीच आहे, पण मुद्दा हा की समीक्षा कलानिर्मितीवर भारी पडतेय का? आणि तसं होत असेल तर तिथे चिंतेला जागा आहे!

रंग, स्वाद, गंध याची ओढ लागलेल्या एका उंदराची स्वयंपाक करण्याची 'प्रोसेस', त्याच्या सगळ्या मोहक हालचाली, त्याने आणि लिंग्विनीने मिळून केलेला स्वयंपाक हे पाहत असताना किंवा पिक्सार, डिस्ने, ड्रीमवर्क्स यांचे कुठलेही चित्रपट पाहत असताना जाणवतं की प्रत्यक्षात हे काहीच शक्य नाही हे आपल्याला कळतंय, पण चित्रपटाचे कर्ते या कल्पित दुनियेत नेऊन जे दाखवत आहेत ते आवडतंय, ते भन्नाट आहे आणि ते आपल्याला वेगळ्या सजीवाच्या स्थानावरून माणसाला विचारात पाडणारं भाष्य करत आहेत. त्यामुळे 'रातातुय ' किंवा इतर चित्रपट बघत असताना मला अल्बर्ट आईन्स्टाईनचं एक प्रसिद्ध विधान सारखं आठवतं – इमॅजिनेशन इज इंटेलिजंस हॅविंग फन!

आणि या 'फन'मधून अवचित जे गवसत आलं आहे त्याने मी कायमच भारून जात आलो आहे! कारण ते कधीकधी वस्तुनिष्ठ विचार करूनही गवसत नाही! 

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Thursday, February 20, 2014

'दृष्टी' देणारा 'शौर्य'


समर खान या दिग्दर्शकाचा 'शौर्य' हा चित्रपट बघण्याआधी मी त्याचा 'कुछ मीठा हो जाए' हा एक हलकाफुलका चित्रपट पाहिला होता.  'शौर्य' हा त्याचा दुसरा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 'अ फ्यू गुड मेन' या गाजलेल्या अमेरिकन चित्रपटावर आधारित आहे असं कळलं होतं. मी तोपर्यंत 'अ फ्यू गुड मेन' पाहिला नव्हता. पण 'शौर्य' पाहिला गेला. आणि तो अतिशय आवडला! कोर्ट मार्शलची एक केस, त्याच्याशी संबंधित नौदलातील एक मोठा अधिकारी आणि त्याला अखेरीस अटक असं  'अ फ्यू गुड मेन'चं साधारण सूत्र होतं. 'शौर्य'मध्ये हा धागा कायम आहे. फक्त कथा मात्र भारतीय लष्करात घडणारी आहे. 

चित्रपट सुरू होतो तो सिद्धांत (राहुल बोस) आणि आकाश (जावेद जाफरी) या आर्मीत वकील असणाऱ्या दोन मित्रांपासून. सिद्धांतचे वडील सीमेवर लढताना मारले गेले आहेत. वडिलांच्या आठवणीने कमालीचा अस्वस्थ होणाऱ्या सिद्धांतचं एक रूप 'हॅप्पी गो लकी' असं आहे. तो एकूणच आयुष्याच्या आणि करिअरच्या बाबतीत फारसा गंभीर नाही. आकाश मात्र गंभीर प्रकृतीचा आहे. दोघांची मैत्री अभेद्य आहे. काश्मीरमध्ये कॅप्टन जावेद (दीपक डोबरियाल) आपल्या कमांडिंग ऑफिसरला गोळी घालून मारतो म्हणून त्याच्यावर खटला सुरू होतो तेव्हा त्यात डिफेन्स काउन्सेल म्हणून सिद्धांतला त्या केसवर आणण्यासाठी आकाश प्रयत्न करतो. तो स्वतः सिद्धांतच्या विरुद्ध केस लढणार आहे. कॅप्टन जावेद अटक झाल्यापासून एक अक्षरही बोलत नाहीये, त्याला गोळी चालवताना त्याच्या सहकारी जवानांनी पाहिलं आहे, त्यामुळे ही अगदी 'ओपन अँड शट' अशी केस आहे, सिद्धांतला फारसं काही करायला लागणार नाही याची आकाशला खात्री आहे. आपल्या आळशी मित्राला एक सोपी केस मिळवून देणे इतकाच आकाशचा उद्देश आहे.

केस सुरू होते आणि मग मात्र सिद्धांत त्यात गुंतत जातो. काहीही न बोलणाऱ्या कॅप्टन जावेदकडे खरं तर बोलण्यासारखं खूप काही आहे याचा सिद्धांतला हळूहळू उलगडा होऊ लागतो आणि तो केसच्या मुळाशी जायचा आटापिटा करू लागतो. यात त्याच्याबरोबर आहे काव्या शास्त्री (मिनिषा लांबा) -  एक पत्रकार. मेजर राठोड हा कॅप्टन जावेदचा कमांडिंग ऑफिसर स्वभावाने कसा होता,  त्याला गोळी घालावी असं जावेदला का वाटलं याचा शोध घेताना सिद्धांत पोचतो ब्रिगेडियर रूद्रप्रताप सिंग (के के मेनन) पर्यंत. ब्रिगेडियर प्रताप हा नावासारखाच भारदस्त माणूस. बुद्धिमान, अहंकारी, स्वतःच्या सैन्यात असण्याचा अभिमान असलेला आणि जगण्यातील उच्च अभिरूची जोपासणारा - अभिजनवादी विचारांचा पक्का पुरस्कर्ता! ब्रिगेडियर प्रताप आणि मेजर राठोड यांच्यात काहीतरी नातं आहे आणि या दोघांचीही हिंदुत्वाबाबतची वैचारिक धारणा सारखी आहे हे सिद्धांतला उमगतं आणि निर्दोष मुस्लिमांना एका सर्च ऑपरेशनच्या दरम्यान बिनदिक्कतपणे मारून टाकणाऱ्या मेजर राठोडला जावेदने नाईलाजाने गोळी घातली हे सत्य अखेरीस समोर येतं. राठोडचा पाठीराखा असलेल्या प्रतापला अटक करण्यात येते आणि जावेद निर्दोष सुटतो. 

अतिशय बांधीव पटकथा, ताकदीचे संवाद आणि कमाल अभिनय ही 'शौर्य'ची तीन बलस्थाने आहेत. चित्रपट प्रभावी असला तरी हिंदू-मुस्लिम मुद्द्याचं या चित्रपटात सुलभीकरण केलं गेलं आहे असं काही समीक्षकांचं मत होतं. मी स्वतः चित्रपटातील कथेकडे फक्त हिंदू-मुस्लिम संदर्भातच न बघता थोड्या अधिक व्यापकपणे बघतो. आपल्या बायकोवर आणि मुलीवर घरातील मुस्लिम नोकराने एके दिवशी बलात्कार केला आणि त्यांचा खून केला म्हणून सर्व मुस्लिमांवर पेटून उठलेला प्रताप सिद्धांतच्या प्रश्नांना कोर्टात तीक्ष्ण उत्तरे देतो तेव्हा एका मोठ्या जबाबदार अधिकाऱ्याच्या मनातील द्वेषाचा, त्याच्या आततायी वागण्याचा राग येतोच पण दुसरीकडे त्याचं व्यक्तिगत दुःखही आपण अमान्य करत नाही. आणि इथेच हा चित्रपट आपल्याला काही 'मूलभूत' सांगू पाहतो.  

हे 'मूलभूत' काय? तर ते हे की माणसाच्या दुःखाशी कुणाचंच वैर नाही. माणसाला दुःख आहे, समाजजीवनात शेकडो प्रश्न आहेत आणि हे नाहीसं कसं करायचं हा सगळ्यावर कडी करणारा महाप्रश्न आहे! तेव्हा या सगळ्याबद्दल सहानुभूती असली तरी माणूस म्हणून आपली धारणा काय? आपण सूडाच्या भावनेत जगत सुखी राहू शकू का? आपण आपल्या दुःखाचं विश्लेषण कसं करतो? याची उत्तरं शोधणं आपल्याला भाग आहे. सिद्धांत प्रतापला प्रश्न विचारतो की सगळ्या मुस्लिमांना नाहीसं करणं हे जर तुझं उत्तर असेल तर मग ज्याने मार्टिन ल्यूथर किंगला मारलं किंवा ज्याने गांधीजींना मारलं त्याच्या धर्माच्या सगळ्या माणसांना मारून टाकायचं का? तेव्हा प्रश्न हा की आपण आपल्याला व्यक्तिगत दुःख देणाऱ्या माणसाकडे माणूस म्हणून बघतो की लेबलं लावून बघतो ?

धर्माला राष्ट्रवादाचा आधार करण्याचे प्रयत्न होत असताना सम्यक दृष्टी, समता, न्याय आणि स्वातंत्र्य हेच कुठल्याची देशाच्या राष्ट्रीयतेचे आधारस्तंभ असायला हवेत हे पुन्हा पुन्हा सांगण्याची आज गरज आहे. या पार्श्वभूमीवर 'शौर्य'सारखा चित्रपट एक मोठीच दृष्टी देऊन जातो!  

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Thursday, January 16, 2014

जुनी न होणारी दोन गणपतरावांची कथा!

कॉलेजमधलं एखादं लेक्चर बंक करून, त्याबद्दल अपराधीभाव बाळगत, सिनेमा बघायचं जे वय असतं त्या वयात मी 'कथा दोन गणपतरावांची' हा चित्रपट बघितला होता. मात्र हा चित्रपट लेक्चर बंक करून पाहिला नव्हता, तर पुण्यातल्या 'नॅशनल फिल्म अर्काइव्हज'मध्ये रीतसर बघितला होता. हा चित्रपट तेव्हा तर मला आवडला होताच, पण दहा-पंधरा वर्षांनी जेव्हा तो परत पाहिला तेव्हा तर तो अधिकच आवडू लागला. कारण माणसाचे मनोव्यापार आणि त्यातून घडणारे-बिघडणारे मानवी संबंध याचा प्रत्यक्षातला अनुभवही थोडा अधिक परिपक्व झाला होता.

अरुण खोपकर हे कलाक्षेत्रातलं भारदस्त नाव. 'कथा दोन गणपतरावांची' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे 'स्टोरीटेलिंग'चा वस्तुपाठ तर आहेच, पण 'स्टोरी ट्रीटमेंट'चा आणि अभिनयाचादेखील वस्तुपाठ आहे. निकोलाय गोगोलच्या 'इव्हान निकिफोरोविचबरोबर इव्हान इव्हानोव्हीच'कसा भांडला याची कथा' यावर आधारित हा चित्रपट. अक्कडगाव या काल्पनिक गावात घडणारी ही कथा. गणपतराव मोरे पाटील (मोहन आगाशे) आणि गणपतराव तुरे पाटील (दिलीप प्रभावळकर) या दोन जिवलग मित्रांची ही गोष्ट. सोबतीला गावातली इतर नमुनेदार माणसं आहेतच, पण कथेचे नायक हे दोघे. आणि कथेचा विषय म्हणजे त्यांची अतूट मैत्री आणि या मैत्रीला गेलेला तडा. 

पाश्चात्त्य राहणीमानाचा प्रभाव असणारे तुरे पाटील आणि संपूर्ण देशी मोरे पाटील हे दोघे लहानपणापासूनचे मित्र. दोघांनीही लग्न केलेलं नाही. तुरे पाटील शिडशिडीत बांध्याचे, नीटनेटके, शिस्तीला महत्त्व देणारे, काहीसे धूर्त आणि चलाख. मोरे पाटील म्हणजे अगदी अघळपघळ गडी. साधे सरळ आणि आळशी. पण दोघांमधली मैत्री मात्र विशेषच. गावाच्या चर्चेचा विषय असणारी. आई-वडील आपल्या मुलांना उदाहरण देतात अशी मैत्री. एकदा तुरे पाटील मोरे पाटलांच्या घरातली एक जुनी तलवार बघतात आणि तिच्या मोहात पडतात. मोरे पाटलांची ती 'खानदानी' तलवार. तुरे पाटलांनी 'नाहीतरी तुझ्या घरी ती ट्रंकेतच पडून आहे, त्यापेक्षा मला दे, मी काळजी घेईन' असं आर्जव करूनही मोरे पाटील काही बधत नाहीत. त्यात त्यांना चिथवायला मदत होते ती आत्याबाईंची. (उत्तरा बावकरांनी साकारलेली ही व्यक्तिरेखा केवळ लाजवाब!) तुरे पाटील तलवारीच्या मोबदल्यात काही देऊन 'मैत्री नाही तर नाही, व्यवहारच करू' असाही प्रयत्न करून बघतात. पण यश येत नाही. वितुष्ट मात्र येतं. आणि ते चांगलंच गंभीर रूप घेतं. 

आता दोन्ही पाटील एकमेकांना भेटणं तर सोडाच, एकमेकांकडे पाहायलाही तयार नसतात. मैत्रभाव संपतो आणि अस्सल मानवी द्वेषभाव डोकं वर काढतो. मग एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू होतात. एका टप्प्यावर दोघांची दिलजमाई होतेही, पण ती क्षणापुरतीच. आधीचं उसवलेलं काही शिवून निघत नाही आणि दोघे दोस्त कोर्टाच्या चकरा मारू लागतात. मैत्रीचा एक निखळ अध्याय संपतो. 

चित्रपटाबाबत पुष्कळ बोलण्यासारखं असलं तरी दोन गोष्टी खास सांगायच्या आहेत. एक म्हणजे मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर काय ताकदीचे अभिनेते आहेत हे पहायचं असेल किंवा अगदी 'अभिनय म्हणजे काय?' हे शिकायचं असेल तरी हा चित्रपट बघावा. पु. ल. देशपांडे दिलीप प्रभावळकरांबाबत 'असा आर्टिस्ट तिकडे हॉलिवूडमध्ये असता तर त्याने रान पेटवलं असतं' असं एकदा म्हणाले होते. त्याची खात्रीच पटते! मोहन आगाशे ही काय चीज आहे हेही वेगळं सांगायची गरज नाही.  'बेगम बर्वे' आणि 'घाशीराम कोतवाल'मधून प्रेक्षकांची विकेट घेणारे आगाशे इथेही अभिनयाचा जो मानदंड समोर ठेवतात त्याला तोड नाही. या दोघा कसलेल्या अभिनेत्यांची जुगलबंदी या चित्रपटाला अफाट उंचीवर नेऊन ठेवते. 

दुसरं म्हणजे एखाद्या वस्तूची अभिलाषा आपल्याला काय काय गमवायला लावते याचा प्रत्यय हा चित्रपट देतो. एका वस्तूसाठी तुरे पाटील हट्ट धरतात, तो ताणतात आणि पुढे मग हा हट्ट मैत्रीच्याही डोक्यावर बसतो! आता ती तलवार मोरे पाटलांच्याही उपयोगाला येत नव्हती हे खरं, पण ती अगदी 'जीवनावश्यक' गोष्टसुद्धा नव्हतीच. अशावेळी अभिलाषा सोडायची की मैत्री? वस्तूच्या लालसेपायी माणसात विकार प्रवेश करतो आणि बघता बघता त्याच्या नियंत्रणाबाहेर जात त्याच्याही नकळत तो त्या माणसावर कसा राज्य गाजवू लागतो हे या चित्रपटात दिसतं. एखाद्या क्षुल्लक गोष्टीमार्फत सूक्ष्मपणे माणसात हा कली कसा शिरतो आणि हसत्या खेळत्या नात्याची कशी धूळधाण करतो हे बघणं चकित करतं, उदास करतं आणि महत्त्वाचं म्हणजे काही कानपिचक्याही देऊन जातं. 

दोन गणपतरावांची ही गोष्ट मी कधीही बघू शकतो. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर आणि इतरही सगळ्यांच्या अभिनयासाठी, शांता गोखले यांच्या बांधीव पटकथेसाठी, सतीश आळेकरांच्या संवादासाठी आणि अरुण खोपकरांचा कॅमेऱ्यामागचा डोळा आणि दिग्दर्शकीय दृष्टी जे 'दर्शन' घडवते त्यासाठी!  

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Sunday, January 13, 2013

The Maoist Entertainment

Being weird is not Vishal Bhardwaj’s thing. I guess he traveled a bit on that track while making Saat Khoon Maaf, which was a disappointment even if not a complete disaster. Machis, Maqbool, Omkara and Kaminey were masterpieces in their own right, out of which Maqbool remains close to my jittering soul, Kaminey keeps my soul on the edge and Omkara remains close to my threatened belief. But with Matru ki Bijali ka Mandola you get to see a really different Vishal Bhardwaj. Unfortunately, the difference is not enriching.

A few things in Matru ki Bijli ka Mandola are spot on. For instance, the scene where a saffron clad man is chanting rhymes and a bunch of boys (saffron clad) are following him and making the exact same hand movements as he is making while offering samidha in the homakund. You can’t miss ‘the making of fundamentalists’ in this scene. There is a group of Zulu people that helps farmers’ struggle in Mandola village. The African connection in farmers’ struggle is suggestive. And then there is the last scene where a drunken bride makes a complete mockery of wedding.

With some impact to its credit, Matru ki Bijli ka Mandola fails to deliver mainly because ‘Mao’ is a quick action hero here and spends more time drawing caricatures of the imperialists than cutting closer to the aching nerve. While the second half is little more engaging, first half does not make a substantial contribution to the political statement that the movie wishes to make and revolves around the drunken rides of Matru (Imran Khan) and Mandola (Pankaj Kapur). The fact that Mandola is a tyrant when he is sober and a revolutionary when he is drunk is perplexing and even if it has to be accepted as a part of creative liberty, it is not an easy thing to do.

Hukum Singh Matru, Mandola’s Man Friday, who has been assigned a job to keep Mandola away from liquor, turns out to be ‘Mao’ (he is a JNU alumnus) who unites the farmers against the proposed land acquisition for an SEZ. The scheming minister (Shabana Azmi) and her ‘pure-evil-but-lacks-brain’ son Badal (Arya Babbar) are after getting Bijali (Anushka Sharma), Mandola’s daughter, married to Badal so that funds can flow freely.

While it touches an important subject, the movie does not give a linear understanding of the development myth or the state’s logic behind SEZ. The subject was handled with requisite attention in last year’s ‘Shanghai’. MKBKM tries to bring in too much symbols and entertainment and in the process loses its focus. The people’s movement remains like the ‘gulabi bhains’ syndrome that Mandola develops. It comes and goes. It does not get an explanation.

Pankaj Kapur is brilliant as usual and he brings out Mandola with charm and passion. While Shabana Azmi, Imran Khan and Anushka Sharma have their moments, it is Arya Babbar who is a surprise packet of the film.

More than anything, such films need to be viewed for the accuracy of bringing an issue to the surface and painting the inner conflicts. The best example so far is Hazaro Khwahishen Aisi which has made a massive contribution to Indian cinema and Indian political cinema. This film remains a challenge for the filmmakers who want to go deeper and grab the pulse of social-economic upheaval. MKBKM takes the right subject but somehow does not make you sit up and take notice because of its feisty mood. While Hazaro Khwahishen Aisi is a real profound experience, MKBKM is like a holiday that tries hard to be profound.


Sunday, June 28, 2009

Gulaal : A heady mix!

Political ambition at the cost of human aspiration. Forced acceptance in the wake of critical denial. Changing face of good to evil. Revolution, anyone?

Gulal is a stroke that makes you straighten up in your seats for want of more. (If at all there is anything missing in the movie is this want of more. But let me come to that later. To begin with, I am thrilled.)

I am truly thrilled. Gulal is a high voltage political drama cutting through number of pawns in the big game. It is gritty, raw in its commentary on political inferno and absolutely brilliant in its writing. Piyush Mishra does a wonderful job as co-dialogue writer, song writer and musician. Take the lyrics and soundtrack out from Gulal and it would lose half of its impact.

x

The movie starts with Dilip Kumar Singh (Raj Singh Chaudhary), a law student coming to a college in Rajpur. Dilip puts up with Rananjay Singh (Abhimanyu Singh), who actually belongs to royal family of Rajasthan, but hates his father and lives on his own terms. Then there is Dukey Bana (Kay Kay Menon), trying to build an independent Rajput Empire with the help of erstwhile Maharajas who are unhappy with the government and particularly, with democracy. Dukey Bana is influential in college elections and uses it as a platform for his political aspirations. His illegitimate brother, Karan (Aditya Srivastava) has his own grudges against his father who has not given him his name. Karan also carries a hidden political agenda. Dukey Bana makes Rananjay fight the general secretary election. The proceedings take an ugly turn and Rananjay is murdered. Dukey Bana forces Dilip to contest. Dilip wins and enters Kiran (Ayesha Mohan), Karan’s sister, who eventually takes control of Dilip and towards the climax, eliminating everybody, helps her brother achieve his goal.

So, there are men who have an agenda, there is a man who had an agenda, there is a young man who does not know what agenda is and there is a femme fatale. Political aspirations are on the burner, with links rooted in the past and eyes set on reviving the past.

As I said, the entire experience is thrilling with speedy developments, knock out dialogues, music and terrific performances. There is an ensemble cast and everyone is just perfect. Kay Kay Menon again delivers a towering performance. Raj Singh Chaudhary plays the meek Dilip convincingly. Abhimanyu Singh is impressive. Deepak Dobariyal (plays Bhati, Dukey Bana’s right hand) is excellent. Piyush Mishra, (plays Prithvi, Dukey Bana’s England returned eccentric elder brother, whose ideas and dreams are shattered and he now enjoys being a poet who slaps the system with his amazing political satires) needs a special mention. After a long time (after Dil Se and Maqbool), he is in action and he is just unbeatable. One more special mention is to be given to Bhanvar Singh, the cook (Mukesh Bhatt) for his short but memorable act. There are two more characters – Anuja (Jesse Randhawa), who is a professor and is a victim of physical abuse. Madhuri (Mahie Gill) is Dukey Bana’s mistress. Out of these two, Anuja’s track gets completely lost as the drama unfolds. Madhuri, played well by Mahie Gill, does not have to do much except for a couple of song sequences.

Anurag Kashyap again applies his craft over the medium and delivers an engaging drama. Having soaked in its violent splashes, once you sit back and think, you essentially would realise that it was a really a ‘drama’. In fact, a high voltage drama that makes you surrender to its spell, but later you discover that a few parts of the circuit were actually loose. You would have some obvious questions about sudden rise of Kiran, her influence over the men (without an influential figure!), Dilip’s sudden make over and his ability to defy Dukey Bana, portrayal of college as so powerful a platform for politics that you wonder if there is any governing body in the college or the students are actually supposed to be ‘Bhaais’ in the making as a part of their curriculum.

Gulal goes little astray in the second half. Progressions seem so sudden that you are actually not fully convinced with them. Just that cinematic presentation is so damn good that you tend to ignore them.

So, want of more exists. But as an explosive drama, Gulal works well. Do watch it. Watch it for Piyush Mishra and his words. Watch it for the performances. Watch it for its sleek composition. Gulal does not make any political statement neither it can be considered as a riveting, out and out political movie, because the focus is more on dramatic rendition than on the ideological debate. However, it is fiery enough to make your emotions sizzle. Go, get your dose!

x

Dev D : As dark as it gets

So, is it about love? Is it about intimacy? Is it about passionate self proclamation? Is it about pure, unadulterated lust? Is it about ‘halaat ki majboori’?

Forget ‘The’ Devdas that has been written and portrayed so far by different filmmakers. Anurag Kashyap’s Dev D is just about one’s self. His Devdas is alienated from the rest of the world with an unprecedented amount of indignity, his Paro is jaw droopingly passionate, articulate, vivacious and at the best of her sexual self. His Chandramukhi is demure, bitten by the societal apathy and self assuredly free.

Dev D boils with the living bodies of these three people with the soul that they have almost lost. A word of advice for Devdas, the tragic hero lovers – do not expect a heart warning, ‘I have lost my Paro and now is the time to gulp the sorrow’ kind of picture. The idea remains as is, but the rendition is way different. It is much more of – let me say this – itching Paro and Devdas for whom dil ka milan has taken place long back and now it is time to do some serious stuff which you can do only while lying in the bed (does not matter where the bed is, because Dev D’s Paro goes to the extent of arranging one in Ganne ka khet!)

So, Dev D is your brutal self. Self destructive? Yes. For Dev (Abhay Deol), it is self destructive by all means. Doubting Paro’s (Mahie Gill) virginity, he leaves her and then repents. Accompanied by bottle and beauty (Chanda - Kalki Koechlin) he starts an inward journey and finally lands in the prison following accidental killing of a few people. The movie is shot superbly with all the technical finesse, the scene of accident being one of such instances.

Mahie Gill is great to watch. She is super possessive about Dev and turns equally destructive when Dev insults her. The chemistry between them before break-up and then watching her ego superseding her love makes an engaging story. Mahie Gill does full justice to the character that has been conceived. She places everything at the right place – let it be her love for Dev, her lust, her anger or her practicality. She is actually a ‘good mix’!

Abhay Deol is first rate. But he actually does not have much to do. He is of course not made to cry loudly in Paro’s yaad nor he has to deliver yawn full of dialogues about dard-e-dil. He is mostly shameless and edgy looking man demanding booze and babe. He is not a bad guy but what to do when bad is so attractive? Only his relation with Chanda, his nascent love for her gives him a softer shade. What is remarkable about Dev D is Dev finally goes to Chanda and says that he does not love Paro. His admittance actually does not elevate his character (in fact, for some, it may add to his disgrace), but it creates an intrigue for the viewer and makes him wonder as to what does he mean by that? It may easily be called as ‘one more sin’ by a drunkard, but it also points at love – past, present and future. It is much of a present ‘tensed’ statement. You know that this guy is hopeless, but you feel that he might be somewhere around your own self!

I have only one problem and that is with Chanda. I have always liked this character for its sheer attitude, but Kalki Koechlin, may be because of her phirangi looks, does not find a place in your heart. She has a story to share but again her appearance is a disconnect. I understand that from the perspective of the entire plot, she is shown as the one from a non Indian family, but still the need is not clearly understood. Professionally managed sex trade (in which she gets engaged) with its innovative ways might be one of the reasons.
And then there is ‘the’ music. Amit Trivedi rock once again after Aamir. While the lyrics, (especially ‘Emosanal Atyaachar’ being the team’s creative best) are wonderful, Amit Trivedi’s captivating compositions make up to every mood of the situation. After so many years, with brilliantly written and composed Emosanal Atyaachar, I have heard whistles in the theatre and that too in a multiplex!

Dev D is an irresistible latest addition to new age Hindi cinema which is in the league of Aamir or Oye Lucky Lucky Oye. A bindaas take by Anurag Kashyap with that ruthless ‘wow’ embedded in it. Looks like we have found Quentin Tarantino!

Do watch Dev D. The emosanal atyaachar is worth the money you would pay for the ticket. There is pleasure in the pain!

Aamir : When cinema speaks for itself!

Silence speaks volumes. However clichéd it may sound, at times you do experience it. Today, when I came out of the theater after watching Aamir, I experienced it. There was a silence with me - unbearable, unthinkable, unwanted too because I could notice that it was disconnecting me with the world around me. And all this was because I actually wanted to talk about Aamir.

This movie, ladies and gentlemen, is indescribable. I really am searching for words. Terrific. Master craft. Wonder of cinema (and a marvel of music. Aamir has the kind of background score that clinches you, sucks you in its groove and haunts you till the end scroll.) Here is what we can doubtlessly call work of art. Aamir is a low budget film, the interval happens in 40 mins., film ends in an hour after that and these 100 odd minutes pack up the best that movie making can offer.

I might sound repetitive and you may complain that I have still not got down to the content of the movie, allow me to say this - this is how you make a movie! This is how you build the characters, this is how you operate the camera, this is how an actor (Rajeev Khandelwal, welcome sir and take the seat - actor's i.e., please don't start working on six packs!) make you feel the pain, this is how cameraman 'shows' the story, this is how director controls every inch of the reel and this is how you offer an experience to the viewers and not just make them munch the popcorn by reducing film making to a two hrs dose of action and sleaze.

It has been long since Johny Gaddar gave us the best of the shots. Aamir, I must say, lands in the league of extraordinary film making with enviable confidence.

There is no way I am going to tell you anything about the story. In one line, it is one man's unsought, frightful journey in the bylanes of Mumbai following his arrival at Mumbai international airport where a death trap is waiting for him. And this is a kind of Mumbai, that is never seen before. I dare say that this Mumbai is worth watching even for the substantive filmmakers like Ramgopal Varma and Anurag Kashyap. There are torn buildings and shredded faces and a 'neatly' dilapidated life and the camera actually does the talking. Some shots are incredibly brilliant, which include a couple of short fight scenes. Boy! I wonder how did they do it?

Rajeev Khandelwal delivers a power packed performance. Its about the protagonist's inner conflict, which he has been able to showcase very very effectively. Watch out especially for the climax scene. You actually move with him, feel his anguish, can relate with him and get awestruck with the choice that he makes in the end. Other characters, some of whom we have seen, many of them we have not seen yet, do their bit with perfection.

Aamir is inspired by a Filipino film Cavite, but kudos to Rajkumar Gupta, as he has shown Aamir to the makers and has got a no-objection certificate from them. This, actually is something that does not come easy to me, because however great a movie is, if the roots remain somewhere else, it becomes difficult to enjoy the splendor of the blossom. This happened with Shaurya (inspired by A few good men) also. But then, Aamir is an amazingly outstanding work and moreover, obtaining permission from the makers is a gesture that wipes off all the doubts regarding plagiarism.

Efforts by lensman Alphonse Roy (a wildlife cinematographer and debuting with Aamir) are captivating. If this is a debut, then one can possibly make out what to look for in his next film. I actually could not get enough of a particular chase sequence. It was painstakingly shot and ended just when I was demanding for more run. And that was it. Take a bow, Mr. Roy and Mr. Gupta, for the perfect timing!

Editing by Aarti Bajaj (Black Friday) is sleek, cut to the point and screenplay is so powerful that you cannot take your eyes off. Alongside, ladies and gentlemen, comes the music of Aamir. With your eyes, your ears too are glued to the screen. Be it the upbeat track during the titles or Amit Trivedi's brilliant compositions that work literally as a narrator, it rocks!

Aamir is arguably the best debut so far by a director, cinematographer and actor. We must applaud the effort because this is some serious cinema where camera, lights and action MEAN camera, lights and action. This is the cinema where these words do not lose their sheen by a star or debut of a star kid backed by media management. This is the cinema where cinema talks for itself and not for the stars!